Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Saturday, September 18, 2021

बोधकथा

ब्राह्मण आणि चोर

एके दिवशी एक ब्राह्मण आपल्या बकरीसोबत चालला होता.काही चोरांनी त्याचा पाठलाग केला.त्यांना ती बकरी त्या ब्राह्मणापासून चोरायची होती त्यांनी एक युक्ती योजली. युक्तीनुसार ,त्या तिघांनी त्याला काही मूर्ख प्रश्न विचारून त्या ब्राह्मणाला गोंधळात टाकायचे होते.जसा ब्राह्मण रस्त्याच्या कडेला बकरीसोबत चालत होता.

त्यातील एक चोर तिथे आला आणि त्याला विचारले “ गुरुजी तुम्ही तुमच्या कुत्र्याला कोठे घेऊन चालले आहात ? ब्राह्मण म्हणाला कि “ तू मूर्ख आहेस काय ? हि बकरी आहे “ काही अंतर चालल्यावर दुसऱ्या चोराने त्याला रस्त्यात गाठले , आणि तो म्हणाला “ गुरुजी तुमचा गाढव फार सुंदर आहे.” ब्राह्मण उत्तरला “काय मूर्खपणा आहेस हि बकरी आहे गाढव नाही,”  ब्राह्मणाला आश्चर्य वाटले कि का बर रस्त्यातील लोक वेड्यासारखे बोलत आहे.काही अंतर चालल्यावर त्याला अजून एक चोर भेटला, तो म्हणाला “ गुरुजी तुम्ही तुमच्या घोड्यावर का बसत नाही “ त्या चोराच्या अश्या बोलण्याने ब्राह्मण घाबरला त्याने बकरीकडे पाहिले , त्याला वाटले आपल्यामागे जणू भूताच लागले आहे.कारण लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोलत होते. त्याने त्या बकरीला तिथेच सोडून दिले आणि पळून गेला.तिघे चोर एकत्र आले, आणि ब्राह्मणाच्या मुर्खपनावर हसून त्यांनी त्या बकरीला ताब्यात घेतले.

तात्पर्य – ऐकावे जनाचे करावे मनाचे.

 

       💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 

कुरूप झाड

  कोणे एके काळी एका जंगलात खूप सारी झाडे होती. जंगल घनदाट होते.जंगलातील सगळी झाडे नाजूक आणि सरळ होती.परंतु एक झाड मात्र वेडेवाकडे होते. ते रुंद आणि वाकडे होते.वाकडे असल्यामुळे ते झाड सरळ आकाशाकडे वाढले नाही.उलट सगळीकडे त्याची वाढ होत गेली

.त्याला स्वताचाच तिटकारा वाटायचा.त्याला वाटायचे का बर ? आपण इतर झाडासारखे नाही.ते स्वतःशीच विचार करायचे.झाड प्रचंड दु:खी होते.पण एके दिवशी एक लाकुडतोड्या तिथे जंगलात आला.त्याने काही झाडांची तोडण्यासाठी निवड केली.त्याने तोडण्यासाठी सरळ आणि उंच झाडांची निवड केली, कारण अशा झाडापासून त्याला खूप पैसा मिळणार होता.त्याने ती झाडे एक एक करून तोडून टाकली.फक्त वाकड्या झाडाला सोडून दिले कारण ते त्याच्या काहीच कामाचे नव्हतेसुदैवाने ते झाड वाचले व इतर झाडे मोडून पडले.आपल्या कुरूपपणामुळेच आपण वाचलो याचा त्याला अभिमान वाटला.तेव्हापासून ते झाड स्वताचा अभिमान बाळगू लागले.

तात्पर्य – खरी सुंदरता रुपात नाही.

 

 💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 

गाढव म्हातारा आणि मुलगा

वडील आणि त्याचा मुलगा एकदा बाजारातून त्यांच्या गाढवासोबात जात होते.रस्त्यात एका म्हाताऱ्याने त्यांच्याकडे पहिले आणि आश्चर्याने म्हटले. “ तुम्ही लोक गाढव सोबत असतांना असे पायी का बर चालत आहे?”तुमच्या मुलाला का बर तुम्ही गाढवावर बसवून घेत नाही ? वडिलाला वाटले म्हाताऱ्याचे म्हणणे बरोबर आहे.त्याने आपल्या मुलाला गाढवावर बसवले आणि स्वतः पायी चालू लागला.काही दूर गेल्यावर एक म्हातारी त्यांना वाटेत भेटली ती चिडून म्हणाली “ कसला मुलगा आहेस तू ?तू आरामात गाढवावर बसून आपल्या म्हाताऱ्या वडिलांना पायी चालवतोस ?”मुलाला वाईट वाटले तो खजील झाला.त्याने आपल्या वडिलाला आता गाढवावर बसायला सांगितले. आता वडील गाढवावर बसला आणि मुलगा चालू लागला.वाटेत एका बाईने त्या वडिलाला टोमणा मारला.” कसला वडील आहेस तू ? आपल्या छोट्या मुलाला पायी चालवत आपण मात्र आरामात बसला आहेस ? या वेळी आता वडील आणि मुलगा दोघेही गाढवावर बसले. काही अंतरावर एक तरुण वाटेत जात होता, तो म्हणाला “दोघेही किती निर्दयी आहात गरीब गाढवावर वजन टाकून त्या किती त्रास देत आहात?” वडील आणि मुलगा दोघेही आता थकले.ते दोघेही खाली उतरले आणि त्या गाढवाला आता खांद्यावर घेउन चालू लागले.ज्यांनी कोणी त्यांना पहिले त्यांनी त्यांची टर उडवली.

तात्पर्य – लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे कधीही लक्ष देऊ नये.

 

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 

उंच झाड

एका जंगलात खूप सारे झाडे होती. एके दिवशी ,एक झाड दुसऱ्या झाडावर ओरडले ,” ह्या जंगलातील प्राण्यांनी व पक्ष्यांनी आपला जीव वैतागून टाकला आहे. हे सगळे प्राणी आणि पक्षी  मोठमोठ्यांनी आवाज करतात व पक्षी आपल्या फांद्यावर घरटी बांधतात ! आपल्याला काही तरी करायलाच पाहिजे. सगळ्या झाडामध्ये चर्चा झाली.सगळ्यांनी प्राणी व पक्ष्यांना हाकलून देण्याचे ठरवले.सगळ्या झाडांना हि युक्ती आवडली, ते सगळे सहमत झाले.दुसऱ्या दिवसापासून ते भयानक आवाज काढू लागले, या सर्व प्रकारामुळे जंगलातील सर्व प्राणी व पक्षी भयभीत झाले. जीवाच्या भीतीने ते पळू लागले.काही काळानंतर जंगलातील सर्व प्राणी व पक्षी दिसेनासे झाले.एके दिवशी एक लाकुडतोड्या जंगलात आला त्याने एक एक करून झाडे तोडू लागला .”कमालच आहे बुवा आम्ही आजपर्यंत एकही माणूस या जंगलात पहिला नाही हा कसा काय जंगलात आला ? झाडे विचार करू लागली.आपण प्राणी व पक्ष्यांना हाकलून देऊन फार मोठी चूक केली याचा झाडांना पश्चाताप झाला.प्राणी असते तर कदाचित झाडे वाचली असती.लाकुडतोड्याने परिस्थितीचा फायदा घेत सर्व झाडे कापून टाकली.

तात्पर्य – कोणालाही कमी समजू नये.

 

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 

 गर्वाचे घर खाली

   भीम हा ताकतीने बलशाली पांडव होता.त्याला आपल्या बाहुबलाचा फार गर्व होता.एकदा काय झाल, खांद्यावर गदा टाकून तो ऐटीत चालला होता.वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला.त्याची लांब शेपटी वाटेत त्याने पसरून ठेवली होती.भीम म्हणाला “ अरे तुझे शेपूट आखडून घेना वाटेत काय पसरून बसला आहेस ? वानर म्हणाला “मला ते उचलत नाहीस.तूच उचलून ठेवनास बाबा “भीम ते उचलू लागला तर ते उचलेना . गदा घालून त्याने प्रयत्न केला तरी ते हलेना .भीमाची चांगली दमछाक झाली.त्याने त्या वानराची क्षमा मागितली.व म्हणाला.”तू खरा कोण आहेस ?सांग .मला माझ्या शक्तीचा फार गर्व झाला होता.” मी पुन्हा गर्वाने वागणार नाही.वानराने आपले खरे रूप दाखवले.तो होता महापराक्रमी रामभक्त हनुमान !

तात्पर्य – गर्वाचे घर खाली.    

 

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 

माणुसकी

 आई मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत गेली असता तिला पुस्तकाच्या कपाटात जाणारी मुंग्याची तिला रंग दिसली.कपाट उघडले असता एका पुस्तकाच्या मागील बाजूस दोन पोळ्या पडल्या होत्या.मुलगा शाळेतून आला.आईने त्याला विचारले.”तुझ्या पुस्तकांच्या कपाटात पोळ्या रे कशा?” मुलाला लाज आली.पण सर्व धैर्य एकवटून तो म्हणाला, “ आई ग, माझ्या ना जेवणाच्या ताटातील दोन पोळ्या मी रोज समोरच्या म्हाताऱ्या भिकारणीला देत असतो .पण काल ती म्हातारी आलीच नाही तिच्यासाठीच या चपात्या आहे.”आई रागावली नाहीच तर उलट तिने त्याला शाबासकी दिली.

तात्पर्य – मानवधर्म हाच खरा धर्म.

 

   💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 

मुंगी आणि कबुतर

एका जंगलात एक मुंगी व एक कबुतर राहत होते. दोघामाद्ध्ये खूप चांगली मैत्री होती.दोघेही एकमेकांना गरज पडेल तेव्हा मदत करायचे.एके दिवशी नदीत पुंन्हा मुंगी पडली जीवांच्या आकांताने ती तडफडू लागली. कबुतराने ते पाहिले पण नेहमी आपणच का मुंगीला वाचवायचे या विचाराने त्याने मुंगीकडे दुर्लक्ष केले. बिचारी मुंगी शेवटी गतप्राण झाली, शेवटी तिने श्वास सोडला आणि मरून गेली.दुसऱ्या दिवशी तिथे जंगलात एक पुंन्हा तोच शिकारी आला. त्याने कबुतरावर नेम धरला ,आणि गोळी घातली यावेळी मुंगी तिथे नसल्याने शिकाऱ्याचा नेम चुकला नाही तर बरोबर कबुतरावर जाऊन बसला.कबुतर जागीच ठार झाले. अशा रीतीने कोणीच कोणाला वाचवू शकले नाही ,शेवटी दोघानाही आपापला प्राण गमवावा लागला.

तात्पर्य – अविचाराने नेहमी घात होतो.

 

No comments:

Post a Comment