🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
✧जीवन किती काळ जगला यापेक्षा जीवन कसे जगलात याला फार महत्व आहे.
✧शिक्षण हे पणतीने पणती पेटवण्यासारखे आहे.
✧रागाला जिंकण्याचा एकच उपाय ,म्हणजे मौन.
✧स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.
✧कोणतीही कला हि रोपासारखी असते.
✧शूर व देशप्रेमी माणसे माणसे समाजाला प्रिय असतात.
✧अज्ञानाला लढायचे तर ज्ञानाने लढता येईल.
✧प्रतिकूल परिस्थितीबद्दल तक्रार करण्यापेक्षा तिच्यावर मात करण्यासाठी झटत रहा.
✧एखादी तरी कला शिकावी कारण कलेतून मिळणारा आनंद हा अक्षय असतो .
✧निरोगी मुले हि राष्ट्राची खरी संपत्ती आहे.
✧सुधारणा हि मनातून झाली पाहिजे. नुसते नियम करून उपयोग नाही.
✧विद्यादान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे , कारण अन्नाने क्षणिक तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभर आनंद मिळतो. – उपनिषद
✧उदासीनता हा फार वाईट रोग आहे . – डॉ. आंबेडकर
✧निसर्गावर प्रेम करा , निसर्ग आपली माता आहे . – साने गुरुजी
✧प्रयत्न हाच देव.
✧गरज हि ज्ञानाची जननी आहे.
✧अनुभव हाच सर्वात मोठा शिक्षक आहे.
✧शिक्षण हाच मानवाचा तिसरा डोळा आहे.
✧विद्या विनयन शोभते.
✧संकृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.
✧निरोगी मुली हीच राष्ट्राची खरी संपत्ती होय्.
✧आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.
✧विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते.
✧अन्यायाशी तडजोड करणे हे महापाप आहे.
✧कलेतून निर्माण झालेला आनंद हा अक्षय टिकणारा असतो.
✧पुस्तकाची किंमत हि रत्नापेक्ष्याही श्रेष्ठ असते.
✧आरोग्य हेच व्यक्तीचे खरेखूरे धन होय.
✧जीवनात सुस्वभावाला अधिक महत्व आहे.
✧कृतज्ञतेसारखी या जगात सुंदर गोष्ट नाही.
✧लहान मुलामद्धे आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय. –आईनस्टाईन
✧प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास – साने गुरुजी
✧शरीर ,मन ,बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण.
✧उठा,जागे व्हा ,ज्ञान प्राप्त करा , असे समजू नका कि तुंम्ही दुर्बल आहात.- स्वामी विवेकानंद
✧हिरादेखील पैलू पाडल्याशिवाय चमकत नाही.
✧एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिक्षित होते.
✧जुन्यापासून बोध घ्या, नव्याचा शोध घ्या.
✧ज्ञानी मनुष्य ह्या विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
✧केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे विद्या होय. –डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
✧लोकमत लहरी असते.-आगरकर
✧कारणाशिवाय काहीच घडत नसते. –थेलीस
✧शब्द हे अविनाशी असतात. – पतंजली
✧माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते. – अँरिसस्टँटल
✧तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. परप्रकाशित राहू नका. स्वताच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. – डॉ. आंबेडकर
✧जीवन म्हणजे एक समरभूमी आहे.
✧बुद्धिमान मुले हि राष्ट्राची अत्यंत महत्वाची ठेव आहे.
✧धर्माचे मूळ भीतीत असते. – ह्यूम
✧माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. – भगवान गौतम बुद्ध
✧जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केलीत , तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.
–रवींद्रनाथ टागोर
✧सहानुभूतीच्या हजार शब्दांपेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो. – संत गाडगेबाबा
✧शब्द अविनाशी असतात. - पतंजली
✧मिळवा व शिका. -कर्मवीर भाऊराव पाटील.
✧सामार्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही . – डॉ. आंबेडकर
✧समता , स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तिविकास होतो. – डॉ. आंबेडकर
✧माणसाने कितीही काम केले तरी तो मरणार नाही. – जवाहरलाल नेहरू
✧स्त्री हि पुरुषाची साथी आहे आणि योग्यतेत त्याच्यापेक्षा मुळीच कमी नाही . – म . गांधी
✧घर म्हणजे एकमेकांना माणसाळविण्याची शाळा आहे. – साने गुरुजी
✧स्वातंत्र्य हे सर्वोच्च जीवनमूल्य आहे. – मानवेंद्र राय
✧अडाणी राहू नका , मुलाबाळांना शिकवा. – गाडगेमहाराज
✧गुरुपेक्ष्या शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे – भाऊराव पाटील
✧माणूस प्रयत्त्नवादाने सर्व काही करू शकतो. – महावीर
✧सत्यपालन हाच धर्म , बाकीचे सगळे अधर्म आहेत. – म. ज्योतिबा फुले
✧क्षणाचा राग जीवनाचा विध्वंस करू शकतो.- म. गांधी
No comments:
Post a Comment