Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

अनमोल सुविचार

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀


    ✧ ‘लवकर निजे ,लवकर उठे तया विद्या – आरोग्य –ज्ञान –संपत्ती मिळे.’

 

जीवन किती काळ जगला यापेक्षा जीवन कसे जगलात याला फार महत्व आहे.

 

शिक्षण हे पणतीने पणती पेटवण्यासारखे आहे.

 

रागाला जिंकण्याचा एकच उपाय ,म्हणजे मौन.

 

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.

 

कोणतीही कला हि रोपासारखी असते.

 

शूर व  देशप्रेमी  माणसे माणसे समाजाला प्रिय असतात.

 

अज्ञानाला  लढायचे  तर  ज्ञानाने  लढता  येईल.

 

प्रतिकूल परिस्थितीबद्दल  तक्रार करण्यापेक्षा तिच्यावर मात करण्यासाठी झटत रहा.

 

एखादी तरी कला शिकावी  कारण कलेतून मिळणारा आनंद हा अक्षय असतो .

 

निरोगी मुले हि राष्ट्राची खरी संपत्ती आहे.

 

सुधारणा  हि  मनातून झाली पाहिजे. नुसते  नियम करून उपयोग नाही.

 

विद्यादान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे , कारण अन्नाने क्षणिक तृप्ती  मिळते, तर विद्येने  जीवनभर आनंद मिळतो. –  उपनिषद

 

उदासीनता  हा फार वाईट  रोग आहे .  – डॉ. आंबेडकर

 

निसर्गावर प्रेम करा , निसर्ग आपली माता आहे . – साने गुरुजी

   

प्रयत्न हाच  देव.

 

गरज हि ज्ञानाची जननी आहे.

 

अनुभव हाच सर्वात मोठा शिक्षक आहे.

 

शिक्षण हाच मानवाचा तिसरा डोळा आहे.

 

विद्या विनयन  शोभते.

 

संकृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.

 

निरोगी मुली हीच राष्ट्राची खरी संपत्ती होय्.

 

आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.

 

विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते.

 

अन्यायाशी तडजोड करणे हे महापाप आहे.

 

कलेतून निर्माण झालेला आनंद हा  अक्षय टिकणारा असतो.

 

पुस्तकाची किंमत हि रत्नापेक्ष्याही श्रेष्ठ असते.

 

आरोग्य हेच व्यक्तीचे खरेखूरे धन होय.

 

जीवनात सुस्वभावाला अधिक महत्व आहे.

 

कृतज्ञतेसारखी या जगात सुंदर गोष्ट नाही.

 

लहान मुलामद्धे आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय. –आईनस्टाईन

 

प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास – साने गुरुजी

 

शरीर ,मन ,बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण.

 

उठा,जागे व्हा ,ज्ञान प्राप्त करा , असे समजू नका कि तुंम्ही दुर्बल आहात.- स्वामी विवेकानंद

 

हिरादेखील पैलू पाडल्याशिवाय चमकत नाही.

 

एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब  शिक्षित होते.

 

जुन्यापासून बोध घ्या, नव्याचा  शोध घ्या.

 

ज्ञानी मनुष्य ह्या विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

 

केवळ पुस्तके वाचून ढीगभर  ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे विद्या होय. –डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 

लोकमत लहरी असते.-आगरकर

 

कारणाशिवाय काहीच घडत नसते. –थेलीस

 

शब्द हे अविनाशी असतात. – पतंजली

 

माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते. – अँरिसस्टँटल

 

तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. परप्रकाशित राहू नका. स्वताच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. – डॉ. आंबेडकर

 

जीवन म्हणजे एक समरभूमी आहे.

 

बुद्धिमान मुले हि राष्ट्राची अत्यंत महत्वाची ठेव आहे.

 

धर्माचे मूळ भीतीत असते. – ह्यूम

 

माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. – भगवान गौतम बुद्ध

 

जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केलीत , तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.

 

–रवींद्रनाथ टागोर

सहानुभूतीच्या  हजार शब्दांपेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो. – संत गाडगेबाबा

 

शब्द अविनाशी असतात. - पतंजली 

 

मिळवा व शिका. -कर्मवीर  भाऊराव पाटील.

 

सामार्थ्याशिवाय  अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही . – डॉ. आंबेडकर 

 

समता , स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तिविकास होतो. – डॉ. आंबेडकर

 

माणसाने कितीही काम केले तरी तो मरणार नाही. – जवाहरलाल नेहरू 

 

स्त्री हि पुरुषाची साथी आहे आणि योग्यतेत त्याच्यापेक्षा मुळीच कमी नाही . –  म . गांधी 

 

घर म्हणजे एकमेकांना माणसाळविण्याची शाळा आहे. – साने गुरुजी 

 

स्वातंत्र्य हे  सर्वोच्च जीवनमूल्य आहे. – मानवेंद्र राय 

 

अडाणी राहू नका , मुलाबाळांना शिकवा. – गाडगेमहाराज

 

गुरुपेक्ष्या शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे – भाऊराव पाटील 

 

माणूस प्रयत्त्नवादाने सर्व काही करू शकतो. – महावीर 

 

सत्यपालन हाच धर्म , बाकीचे सगळे अधर्म आहेत. – म. ज्योतिबा फुले

 

क्षणाचा राग जीवनाचा विध्वंस करू शकतो.- म. गांधी

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment